अमळनेर : पीक कर्ज घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणारी अट शिथिल किंवा रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पत्र पाठवून संबंधित अटीचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.सध्या पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना संबंधित शेतकऱ्याने त्या हंगामात संबंधित पिकासाठी किंवा जमिनीसाठी कोणतेही सक्रिय किसान क्रेडिट कार्ड (KCC) अथवा कृषी पीक कर्ज घेतलेले नसल्याची घोषणा करावी लागते. भविष्यात ही माहिती चुकीची असल्याचे आढळल्यास अर्ज फेटाळणे, विमा पॉलिसी रद्द करणे किंवा विमा लाभ नाकारणे, अशी तरतूद आहे. या अटीमुळे पीक कर्ज घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, अनेक पात्र शेतकरी विमा संरक्षणापासून दूर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आमदार अनिल पाटील यांनी यावर आक्षेप घेत सांगितले की, शेतीसाठी बियाणे, खते,