अमळनेर : शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असताना अमळनेर येथील सायरादेवी बोहरा स्कूल येथे आरटीई विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शालेय साहित्य, पुस्तके, गणवेश व इतर बाबींच्या नावाखाली सुमारे सात-सात हजार रुपये वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.महाराष्ट्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेशित विद्यार्थ्यांकडून गणवेश, पुस्तके, शालेय साहित्य अथवा इतर कोणत्याही कारणासाठी शुल्क आकारण्यास स्पष्ट मनाई केली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी देखील शासनाच्या आदेशानुसार आरटीई विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पूर्णपणे मोफत देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. असे असतानाही अमळनेरमध्ये शासन आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळेकडून केवळ आर्थिक मागणीच केली जात नाही तर पालकांना वर्गशिक्षकांना