जामनेर मॉब लिंचिंग प्रकरणी अमळनेरमध्ये मुस्लिम समाजाकडून निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

“अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना मुस्लिम समाजातील मान्यवर”

कठोर कारवाई व पीडित कुटुंबाला न्यायाची मागणी

अमळनेर (अटकाव न्यूज )
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे घडलेल्या तरुण सुलेमान खान यांच्या मॉब लिंचिंगच्या घटनेविरोधात अमळनेर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

“घटना संविधानिक मूल्यांवर घाव घालणारी”

निवेदनात म्हटले आहे की, “सुलेमान खान यांचा मृत्यू हा केवळ एका तरुणाच्या जीवावर बेतलेला नाही, तर समाजातील सलोखा, बंधुता आणि संविधानिक मूल्यांवर गंभीर आघात करणारा आहे. अशा घटना समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करतात. त्यामुळे यावर तातडीने आळा बसणे गरजेचे आहे.”

निवेदनातील मुख्य मागण्या

सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी

या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून कायद्याने धडा शिकवावा

पीडित कुटुंबास तातडीने आर्थिक मदत व सरकारी नोकरी द्यावी

धार्मिक उन्माद पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे

मान्यवरांची उपस्थिती

निवेदन सादर करताना नसीर हाजी, फिरोज मिस्री, मौलाना रियाज शेख, शेखा हाजी, गुलाम नबी, शेख नविद, इमरान शेख कादर, सैय्यद अजहर अली, ॲड. शकील काजी, अहमद सैयद, जमालोद्दीन, जुबेर पठान, मुशीर शेख, जावेद खान, काशीफ अली, अलीमोद्दीन शेख, शाहरुख बागवान यांच्यासह अनेक मान्यवर व मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाची भावना

या अमानुष घटनेने स्थानिक पातळीवर संतापाची लाट पसरली आहे. “अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत, अन्यथा समाजात असुरक्षिततेची भावना अधिकच वाढेल”, असे मत समाजातील मान्यवरांनी व्यक्त केले.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें