खान्देश विभागाचे नूतन अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांचे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांना आवाहन अमळनेर : पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षितता आणि व्यावसायिक विकासासाठी पत्रकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कार्यरत पत्रकारांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे नवनियुक्त खान्देश विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी केले आहे.पत्रकारांच्या विविध समस्या आणि प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांचा शासनस्तरावर प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. संघटनेचे संस्थापक तथा राज्य संघटक संजयजी भोकरे आणि प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासरावजी आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांशी थेट संवाद साधण्यात आला. या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न जाणून घेत संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यात आले.डॉ. समाधान मैराळे यांनी यापूर्वी तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना पत्रकारांच्या हितासाठी