दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा पालिकेत येऊन जाब विचारण्याचा इशारा अमळनेर : शहरातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गेल्या २२ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर नागरिकांच्या घरापर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने अनेक नागरिकांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे धाव घेत तक्रारी मांडल्या.या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांना आश्वासन नको, तर प्रत्यक्ष पाणी हवे आहे. दोन दिवसांत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा,” अशी स्पष्ट तंबी त्यांनी दिली.तसेच दोन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला