आमदार अनिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी अमळनेर:- राज्य शासनाने इयत्ता ११ वी पाठोपाठ २०२६-२७ पासून इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा मुद्दा समोर आला आहे. ११ वी विज्ञान शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची संधी ऑनलाईन प्रणालीमुळे बंद झाली आहे.यासंदर्भात अमळनेरचे आमदार व माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देऊन पूर्वीप्रमाणे शाखा बदलाची मुभा देण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, २०२५ पूर्वी ऑफलाईन प्रक्रियेत ११ वी विज्ञाननंतर १२ वीला कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेता येत होता. तसेच ११ वी वाणिज्यनंतर १२ वी कला शाखेतही प्रवेशाची सुविधा होती. मात्र, नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे ही लवचिकता पूर्णतः बंद झाली आहे.“ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे खासगी क्लासेस लावू शकत नाहीत. विज्ञान