अमळनेर:-अटकाव न्यूज- कळमसरे–शहापूर मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व फरशी पुलांच्या कामाला सुरुवात झाली असली तरी सुरक्षा उपाययोजनांचा गंभीर अभाव दिसून येत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम सुरू असूनही संबंधित ठेकेदाराकडून कोणतेही सूचना फलक किंवा इशारे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी मातीमिश्रित बारीक खडी टाकून दाबण्याचे काम सुरू असून, कळमसरे–शहापूर दरम्यानच्या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात जवळपास दहा लहान फरशी पुलांचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करण्यात आले आहे.ठेकेदाराने बाजूने पर्यायी मार्ग तयार केला असला, तरी त्या मार्गाबाबत कोणतीही स्पष्ट चिन्हे नसल्याने रात्री वाहनचालकांना रस्त्याची दिशा समजणे कठीण होत आहे. अचानक येणाऱ्या खोलगट भागामुळे अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार वाहनचालकांकडून केली जात आहे.वाहनचालकांचे म्हणणे आहे की, काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक,