अमळनेर : अटकाव न्यूज : छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात 14 मे रोजी ‘स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशनच्या पुढाकारातून आणि जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने हे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रंगणार आहे.या उपक्रमाबाबत माहिती देताना युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील यांनी सांगितले की, सामाजिक जाणिवा जागृत करण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील उणिवा भरून काढण्यासाठी जयनिल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या कार्याचा प्रारंभ म्हणून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.संस्कृती फाऊंडेशनचे नाट्यकलाकार निकेश राजपूत यांनी सांगितले की, या महानाट्यात सुमारे 250 कलाकारांचा सहभाग असून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गाथा सजीव स्वरूपात रंगमंचावर उभी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील कलाकारांचा मोठा सहभाग असून त्यात अमळनेर परिसरातील 100 हून अधिक स्थानिक कलाकारांचा समावेश आहे.यापूर्वी नंदुरबार