
अमळनेर (अटकाव न्यूज ):
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सौहार्द, परस्पर आदर आणि बंधुभाव वाढीस लागावा या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (अमळनेर शाखा) यांच्या वतीने अमळनेर येथे भव्य ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य इफ्तार मिलन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “सर्वधर्म समभाव – बंधुता – राष्ट्रीय एकात्मता” या विचारांना अधोरेखित करणारा हा कार्यक्रम सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा इफ्तार मिलन सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पार पडणार असून, या माध्यमातून सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत समाजात ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये खासदार स्मिता वाघ (जळगाव लोकसभा), आमदार अनिल पाटील (अमळनेर विधानसभा), प्रांताधिकारी मयुर भंगाळे, माजी आमदार शिरीष चौधरी, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष परिक्षित बाविस्कर यांचा समावेश आहे.
तसेच अशोक पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), गणेश शिंदे (मुख्याधिकारी, नगर परिषद), एन. आर. पाटील (BDO), डॉ. अनिल शिंदे (भाजपा) आणि जीभाऊ पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, मारवड) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
उपस्थित राहण्याचे आवाहन
समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दृढ करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.








