युवारंग:वादविवाद स्पर्धेत प्रतापच्या निर्भय सोनार व अमोल पाटीलचे सुयश

अमळनेर: युवारंग महोत्सवात उपविजेत्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार व अमोल पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
‘आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा प्रभाव वाढत आहे/नाही’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेत प्रभावी मांडणी करून त्यांनी रसिकांचे लक्ष वेधले.
प्रताप महाविद्यालय उपविजेते ठरलेल्या या महोत्सवात यशस्वी ठरलेल्या निर्भय सोनार व अमोल पाटील यांना ऍड. सारांश सोनार प्रा. लीलाधर पाटील, यशपाल पवार, योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ ए.बी. जैन, प्रा डॉ नितीन पाटील, डिगंबर महाले, प्रा डॉ रमेश माने, प्रा. संदीप नेरकर, प्रा धीरज वैष्णव, प्रा जी एच निकुंभ, प्रा. कल्पना पाटील, प्रा विजय तुंटे, सचिन खंडारे, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, डॉ जी एम पाटील, विनोदभैय्या पाटील, प्रकाश मुंदडा, प्रा पराग पाटील, मारवड फौजदार बाळकृष्ण शिंदे, पत्रकार बांधव, सुवर्णकार समाज व सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]