धक्कादायक: पतंग उडवीताना तोल जावुन मुलाचा विहरीत पडून मृत्यू .

अमळनेरसह धरणगाव तालुक्यात शोककळा.

संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर आघात:

धरणगाव तालुक्यातून दुर्दैवी घटना समोर आली असून मकर संक्रातीच्या दिवशीच पतंग उडविण्याच्या नादात एका १० वर्षाचा मुलाचा विहरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज रविवार, दि.१५  रोजी घडली आहे.असून संक्रांतीच्या दिवशी माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दि.१५ रविवार रोजी मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जातो, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा बालक आज पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. अक्षय माळी हा पाचवीत शिकत असून तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *