तालुक्यात थंडीमुळे तूर, ‎ हरभरा, गहू या पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता..

अमळनेर- (योगेश पाने) – सध्या तालुक्यातील थंडी शेतकऱ्यांच्या चांगलीच‎ जीवावर उठली असल्याचे चित्र पाहायला मिळत‎ आहे. मागील वर्षी अधिक प्रमाणात झालेला पाऊस‎ आणि त्यामुळे झालेले खरीप हंगामाचे नुकसान‎ यातून बळीराजा वर येत नाही, तोच थंडीमुळे तुरीवर‎ आलेल्या रोगाने ती जळाली आहे, पिकाला बसणाऱ्या वातावरणाच्या फटक्यामुळे‎ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.‎
गहू अती थंडीमुळे परिपक्व होण्याआधीच‎ ओंबी निघत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा‎ उत्पादनावर होणार आहे. अज्ञात रोगामुळे तूरही उभी‎ वळून गेली. त्यामुळे तुरीचे उत्पादन वाढण्याऐवजी‎ कमी होणार आहे. निसर्गाच्या दृष्ट चक्रात‎ अडकलेला शेतकरी पिकाच्या चिंतेत बुडाला आहे.‎ थंडीमुळे तूर व गव्हाची अशी अवस्था‎ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाची चिंता भेडसावत‎ आहे. रब्बीच्या हंगामात तरी चार पैसे पदरी पडतील,‎ या आशेवरही पाणी फिरताना दिसत आहे.‎
काळ्या मातीत घाम गाळून उत्पन्न‎ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी मागील‎ काही वर्षांपासून निसर्गाच्या‎ लहरीपणामुळे निराशाच येत आहे.‎ त्यामुळे कुटुंबाचा डोलारा कसा‎ हाकायचा असा, प्रश्न त्यांच्यापुढे‎ उभा ठाकला आहे.‎ थंडीमुळे हरभरा, तुर व गव्हाची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना‎ उत्पन्नाची चिंता भेडसावत आहे.‎निसर्गाच्या‎ अवकृपेमुळे शेतकरी हतबल‎ झालेत. शासनाने शेतकऱ्यांच्या‎ समस्यांची दखल घेत त्यावर त्वरित‎ उपाययोजना करणे गरजेचे आहे.