आजपासून गायी-म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणेसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान’ जिल्ह्यात राबविण्यात येणार

जळगाव (अमळनेर) – दूध उत्पादनासाठी गायी- म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे व भाकड जनावरांचे वंधत्व निवारण करून माजावर आणण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये ‘राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. शिबिरांमध्ये गायी-म्हशींची तपासणी करून वंध्यत्वाचे निदान करून उपचार करण्यात येणार आहे. जनावरांचे अपेक्षित शारीरिक वजन वाढ व पशू प्रजनाचा थेट संबंध असल्याने शारीरिक वजन घट असलेल्या जनावरांमध्ये वंध्यत्वाची शक्यता दाट असते.

अशा जनावरांची तपासणी करून योग्य पशुआहार देण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये सर्व गायी-म्हशींची तज्ज्ञ टीमद्वारे तपासणी करण्यात येऊन योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत. सर्व पशुपालकांनी या वंधत्व निवारण अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]