A.C.B धुळे यांची कारवाई
अमळनेर : शहरात राहणाऱ्या तक्रारदाराच्या घराचे मीटर गेल्या पाच महिन्यांपासून बंद होते. मीटर बंद असूनही तक्रारदारास सरासरी वीज बिल येत होते. १० दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख हे या बाबत पाहणी व चौकशी करूनही गेले होते. त्या नंतर अभियंता देशमुख यांच्या सांगण्यावरून महावितरण कंपनीचा वायरमन भरत पाटील याने तक्रारदार यांच्या घरी जाऊन 10 हजार रुपयांची मागणी केली होती. त्या नंतर तक्रारदारामार्फत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे या बाबत तक्रार करण्यात आली होती. त्या नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता भरत पाटील याने अभियंता वैभव देशमुख व स्वतःसाठी तडजोड नंतर पाच हजार रुपयात बंद पडलेले मीटर बंद बदलवून देण्यासाठी व तक्रारदारावर कसलीही कारवाई न करण्याचे पाच हजार रुपये मागितले. हे पैसे स्वीकारताना भरत पाटील यास आज संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. आता पुढे अभियन्ता देशमुख यांची देखिल चौकशी करनार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .