चिमनपुरी पिंपळे येथे आदिवासी वस्तीत ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

नाल्यातील पाणी व गटारी चे पाणी घरात शिरल्याने डासांमुळे रहिवासी आजारी तसेच रात्रीचे पथदिवे बंद

अमळनेर: (प्रतिनिधी)- चिमनपुरी पिंपळे परिसरातील आदिवासी वस्ती येथील रहिवाशांनी उघड्या गटार, नाल्याची तक्रार केली. परंतु, आत्ताच तर केले काम वीस पंचवीस दिवस झाल्याचे फोनवरती बोलून अधिकारी मोकळे झाले. आधीच नाल्याच्या पाण्याचा त्रास आणि त्यात ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक होणारा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पिंपळे मधून शिरसाळे कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने असलेल्या गटारावर झाकण नाही. अनेकदा त्यातील घाण पाणी बाजूच्या घरांमध्ये शिरते. घाणीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे परिसरात अनेक नागरिक आजारी पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. सण-उत्सवामध्ये रात्रीचे पथदिवे बंद असल्या कारणाने परिसरात काळोख्या लहान मुलांना वय वृद्ध मातारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून परिसरात लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

[democracy id="1"]