कृषिदूतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अमळनेर: गणपुर ता. चोपडा येथे गणपुर गावात कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषिदूत यश राजेंद्र बऱ्हाटे, वैभव राजेंद्र अनर्थे, दिप सुभाष खुळे, आशिष वसंत बाविस्कर, विशाल केशव जगताप, अभिषेक पोपट निकम, यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले.सरपंच.श्रीमती. मंदाकीनी माधवराव पाटील, उपसरपंच-श्री. युवराज रघुनाथ पाटील, शेतकरी- भटू धर्मराज पाटील, अमोल पाटील, प्रशांत पाटील, राहूल पाटील, प्रकाश पाटील तसेच युवा शेतकरी भावेश भटू पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले. या कार्यक्रमात कृषिमहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभागी
चव्हाण, रावे प्रोग्राम ऑफिसर प्रा. गिरीष पाटील, प्रा. संदिप सांळूखे, प्रा. तुषार देसले, प्रा. नरेंद्र बोरसे, प्रा. शिवाजी गावीत, प्रा. अमोल घाडगे, प्रा. लक्ष्मण बोंद्रे, प्रा. सुनिल गावीत, प्रा. घनश्याम पवार, प्रा. सुदीप पाटील, प्रा.महेश चव्हाण, प्रा.राम रेजितवाड , प्रा. हर्षदा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत हे गावी गावातील पीक लागवड पद्धती, अधुनिक शेतीची माहीती, माती व पाणी परिक्षण कीड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेती विषयक विविध समस्या व त्या वरील उपाय, पीक प्रात्यक्षिक तसेच
इतर शेतीसंबंधी माहीती व मार्गदर्शन करण्यात आले.

[democracy id="1"]