पाडळसे धरणाच्या आंदोलनाकडे आजी माजी मा.आमदार खासदारांनी फिरवली पाठ..
यांच्या कार्यसुचीत पाडळसे धरण आहे का ???
जलआंदोलन समिती मार्फत आज ५२ हजार ५०० पत्र मुख्यमंत्र्यांना रवाना.

अमळनेर : तालुक्यातील ज्वलंत विषय म्हणजे निन्म तापी प्रकल्प – पाडळसे धरण हे होय. हे धरण झाल्यास जळगाव जिल्यातील सहा व धुळे जिल्यातील दोन तालुके म्हणजेच दोन जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून हा मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतु शासनाच्या उदासीनतेने गेल्या २३ वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. या बाबत पाडळसे धरण जनआंदोलन समितीने विविध आंदोलने केली. याच प्रकल्पाच्या नावाने गेल्या २३ वर्षांपासून राजकारण सुरु आहे. तर अनेक लोकांनी या धरणाच्या नावाने विविध पदे भोगली आहेत. परंतु धरणाचे काम अपूर्णच असल्याने दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ५१ हजार पत्रे पाठवण्याचे जनआंदोलन समितीने ठरवले होते. व सर्व लोकप्रतिनिधी व जनतेला सहभागी होण्याचे आवहन करण्यात आले होते. त्या पद्धतीने आज १२ वाजता बळीराजा चौक येथून रैली सुरु झाली. यात शेतकरी, विद्यार्थी व जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. मात्र ज्यांच्यावर अमळनेरकरी जनतेने विश्वास ठेऊन निवडून दिले… ज्यांनी या धरणाच्या नावे विविध पदे भोगली…असे आजी-माजी खासदार, आजी माजी आमदार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी यांच्यासह धरणासंदर्भात शहरात मोठमोठे फ़्लेक्स लावणारे यांनी मात्र दांडी मारल्याचे दिसून आले.

तिन्ही दादांनी दिली तीरी……
अमळनेर तालुक्यातील या ज्वलंत विषयाला आपणच त्याचे कर्ता धर्ता समजत विविध वेळेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे तिन्ही दादा यांनी देखील आज जनतेने पुकारलेल्या या आंदोलनाला तीरी दिलेली दिसली.
स्वताला लोकांच्या मनातील आमदार समजणारे व आजही आमदार म्हणून गाडीत फिरणारे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे भासवणारे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मात्र शेतकरी व अमळनेरकरी जनता रस्त्यावर असतांना जनतेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसले . व शिरीष चौधरी यांनी कधी काळी अमळनेर शहरात १५०० कोटी रुपयांचे मोठ – मोठे फ्लेक्स लावलेले होते. मात्र त्या १५०० कोटींचा आजही तपास लागतांना दिसत नाहीये. यावर बोलतांना जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सांगितले कि, १५०० कोटी बाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता, त्या विषयात कुठल्याही वित्तीय संस्थेकडून महाराष्ट्र सरकारने कर्जाची मागणी केलेली नसल्याचे जलसंपदा विभागाकडून आलेल्या पत्रात म्हटले असल्याचे सांगितले. म्हणून शिरीष चौधरी यांनी १५०० कोटीच्या विषयात देखील तीरी दिल्याचे सिद्ध झाले आहे. …

स्वतःला कृषिभूषण समजणारे साहेबराव पाटील यांनी मात्र आज काम अभूषण असे केले आहे. आज पर्यंत धरणाचा मीच वाली होय. माझ्याशिवाय धरणाला कोणीच एवढा निधी आणला नाही जेवढा मी आणला आहे… अशी जनमानसात भरीव वल्गना करणारे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी देखील आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. वास्तविकता कृषी क्षेत्राबाबत भूषण मिळवलेले मात्र कृषीच्याच संदर्भात महत्वाच्या विषयात दांडी मारली म्हणून सुभाष चौधरी यांनी जरी साहेबराव पाटील यांचा भाषणात चांगला उल्लेख केला असला तरीही नागरिकांत मात्र पाटील यांच्या बद्दल नाराजीचा सूर दिसून येत होता.

ज्या वेळेस मी निवडून येईल त्या वेळेस विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून पाडसे धरणाचा विषय मार्गी लावेल व त्यासाठी मतदार संघात कमी व मंत्रालयात जास्त राहील असे म्हणणारे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील हे देखील आजच्या आंदोलनात नव्हते…

ताई तुम्हीही ???
शिरीष चौधरी यांच्या विरोधात १५०० वरून १८०० कोटींचे मोठ-मोठे फ्लेक्स अमळनेर शहरात लावणाऱ्या विधानपरिषदेच्या माजी आमदार तथा भाजपच्या विद्यमान प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ यांना पाडळसे धरणाचा मुद्दा महत्वाचा वाटला नसावा का ?? असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.

दादा तुमची तर बातच न्यारी, पाडसे धरणाला दिली तीरी… खासदारकीची लॉटरी मिळवलेल्या व त्या लॉटरीचा आनंदात स्वीकार करणारे… जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी देखील धरणाच्या विषयात तीरी दिल्याचे दिसून आले आहे. केंद्राच्या कृषी सिंचन योजनेत या धरणाचा समावेश व्हावा यासाठी काही वर्षांपासून मागणी होत आहे. अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी देखील या विषयात दिल्ली वारी केली होती. मात्र तरी खासदार पाटील यांनी पाहिजे तसा पाठपुरावा या बाबत केलेला दिसून येत नाही. उन्मेष पाटील हे अमळनेर तालुक्याचेही खासदार आहेत कि नाही याचा देखील त्यांना विसर पडल्याचे दिसून येते. कृषी सिंचन योजनेत प्रकल्पाचा समावेश होणेसाठी खासदार यांचा मोठा वाटा असतो. व खासदार पाटील यांचेच केंद्रात सरकार देखील आहे. मात्र एवढ असून देखील धरणाच्या प्रश्नावर त्यांची उदासीनता दिसून येते. म्हणून दादा तुमची बातच न्यारी आणि पाडसे धरणाला दिली तिरी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दरम्यान हे लोकप्रतिनिधी आले नाहीत तरी आज अमळनेरकर जनतेने व विद्यार्थांनी ५१ हजार पात्रांची वाजत गाजत , घोषणा देत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली. व मुख्यमंत्री तसेच उपमुख्यामंत्री यांना पत्रे पाठवली. यावेळी विविध लोकांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर या पत्रांनी जर निधी मिळाला नाही तर पुढील आंदोलन हे तीव्र पद्धतीने छेडण्यात येईल तसेच भविष्यात निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा धारण समितीतर्फे देण्यात आला आहे.

यावेळी रणरणत्या उन्हामध्ये बळीराजा स्मारकयेथे जमलेल्या हजारो आंदोलकांनी बळीराजाला पुष्पहार अर्पण करून क्रांतीची मशाल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पेटविण्यात आली.जनतेने लिहिलेले हजारो पत्र ठेवून सजलेल्या बैलगाडी पुढे काढून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. बैलगाडीपुढे जनआंदोलन समितीचे शेकडो कार्यकर्ते पांढरी गांधी टोपी घालून ‘पाडळसे धरण झालेच पाहिजे ‘ घोषणा देत होते. त्यापुढे मोठ्या संख्येने रॉयल उर्दू स्कूलचे, अँड ललिता पाटील इंग्लिश स्कूल,पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूल,विद्यार्थी पिवळ्या टोप्या घालून चालत होते तर सर्वात पुढे सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी लेझिम खेळत मिरवणुकीला लक्षवेधी शोभा आणली होती.महिला कार्यकर्त्या मोठ्या जोशात घोषणा देत होत्या तर सर्वात पुढे तिरंगा ध्वज घेवून माझी सैनिक संघटनेचे फौजी जिपगाडीवर जय जवान,जय किसानचा नारा देत होते. विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते,विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी ‘धरण झालेच पाहिजे’ या मागणीच्या टोप्या घालून घोषणाबाजी करत विश्राम गृह,विजय मारोती,बस स्टँड,पाचपावली देवी,लालबाग शॉपिंग मार्गे,अग्रसेन महाराज चौकात आले.पोस्ट ऑफिस समोरील मैदानात यावेळी झालेल्या सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ५२५०० पोस्ट कार्डचे गठ्ठे स्टेजवर पोस्ट मास्तर रघुनाथ साळुंखे यांना सुपूर्द केले.यावेळी पोस्ट मास्तर साळुंखे यांनी ५२ हजार ५०० पोस्टपत्र मिळाल्याचे सांगत तातडीने स्टॅम्पिंग करून मंत्रालयात पाठवण्यात येतील असे जाहीर केले.यावेळी समितीचे प्रमुख कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी १९९७ पासून धरणाचे कासवगतीने चालणाऱ्या कामास, वाढणाऱ्या हजारो कोटींच्या किंमतीस राज्यकर्त्यांचा नाकर्ते पणा कारणीभूत ठरला असल्याचा घणाघाती आरोप केला.शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या समितीच्या सहनशीलतेचा अंत: पाहू नका!असा इशाराही दिला. महेंद्र बोरसे यांनी दिरंगाई करते असे सांगितले. धुळे चे मा.आ.प्रा.शरद पाटील यांनी हजारो पत्रांची नोंद शासनाने न घेतल्यास आता समितीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले.तर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी हा एकमेव माणूस सातत्याने धरणासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह लढत असल्याने जनतेनेही आता निष्क्रिय नेत्यांना जागा दाखवावी असे जाहीर आवाहन केले.पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी तालुक्यातील जनतेची सर्वपक्षीय मंत्री व नेत्यांनी निम्न तापी प्रक्लपाबाबत खोटी आश्वासन देवून
फसवणूक केल्याची जाहीर टिका करत आजी माजी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा समाचार घेतला.हजारो पत्रांमधील मागणीनुसार धरनाबाबतच्या सर्व सुधारित प्रशासकीय मान्यता देवून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत निर्णय न झाल्यास पत्रात लिहिल्यानुसार येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असे जाहिर केले.सभेचे सूत्रसंचलन पत्रकार संजय पाटील यांनी केले.आभार महेश पाटील,सुनिल पाटील यांनी मानले.आर बी पाटील यांनी मिरवणुकीत डफावर गीते सादर केली.
मंचावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,चंद्रकांत काटे,समितीचे हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे,आर बी पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागुल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुपडू बैसाणे, अँड तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, रियाज मौलाना, रजाक शेख, नारायण बडगुजर,सुरेश पाटील, एस आर पाटील,
डी के पाटील, सुशील भोईटे आदीं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रांच्या भव्य मिरवणुकीत डॉ अनिल शिंदे, नगरसेवक मनोज पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, आधार फाऊंडेशन चे अशोक पाटील,अरुण देशमुख, मनोहरनाना पाटील, धनगर पाटील, आम आदमी चे शिवाजी पाटील,प्रा गणेश पवार, भाजपचे श्याम अहिरे,महेंद्र महाजन, रमेश धनगर, राष्ट्रवादीचे अनिल शिसोदे,भूषण भदाणे,सुनिल शिंपी, मंगळ ग्रह मंदिर अध्यक्ष दिगंबर महाले, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी,शिवसेनेचे कल्याण पाटील, सूरज परदेशी, बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रथमेश पवार,कुंदन खैरणार, बोहरी समाजाचे मकसुद बोहरी, प्रितपालसिंग बगा,रोटरी चे कीर्ती कोठारी,पांडुरंग महाजन,नावेद शेख, टपरी धारक संघटनेचे चंद्रकांत साळी,फौजी धनराज पाटील आदिंसह मोठ्यसंखेने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मंचावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,चंद्रकांत काटे,समितीचे हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे,आर बी पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागुल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुपडू बैसाणे, अँड तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, रियाज मौलाना, रजाक शेख, नारायण बडगुजर,सुरेश पाटील, एस आर पाटील,
डी के पाटील, सुशील भोईटे आदीं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रांच्या भव्य मिरवणुकीत डॉ अनिल शिंदे, नगरसेवक मनोज पाटील, शेतकरी नेते सुभाष पाटील, आधार फाऊंडेशन चे अशोक पाटील,अरुण देशमुख, मनोहरनाना पाटील, धनगर पाटील, आम आदमी चे शिवाजी पाटील,प्रा गणेश पवार, भाजपचे श्याम अहिरे,महेंद्र महाजन, रमेश धनगर, राष्ट्रवादीचे अनिल शिसोदे,भूषण भदाणे,सुनिल शिंपी, मंगळ ग्रह मंदिर अध्यक्ष दिगंबर महाले, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी,शिवसेनेचे कल्याण पाटील, सूरज परदेशी, बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रथमेश पवार,कुंदन खैरणार, बोहरी समाजाचे मकसुद बोहरी, प्रितपालसिंग बगा,रोटरी चे कीर्ती कोठारी,पांडुरंग महाजन,नावेद शेख, टपरी धारक संघटनेचे चंद्रकांत साळी,फौजी धनराज पाटील आदिंसह मोठ्यसंखेने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.मंचावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,चंद्रकांत काटे,समितीचे हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, रविंद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे,आर बी पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागुल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुपडू बैसाणे, अँड तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, रियाज मौलाना, रजाक शेख, नारायण बडगुजर,सुरेश पाटील, एस आर पाटील,
डी के पाटील, सुशील भोईटे आदीं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.