विद्यमान विधायकांना शासकीय इमारतीपेक्षा शेतकरी महत्त्वाचा घटक वाटत नाही का?? 

आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांची संतप्त तिखट प्रतिक्रिया

सर्व दादासाहेबांनी शेतकऱ्यांच्या कापूस घरात पडलेला असून यावर विचार केला तर दुबारा पेरणीसाठी शेतकरी उभा राहू शकतो ?अन्यथा नाही. लक्ष दिल तर शेतकरी वाचेल शेतकरी वाचवा महाराष्ट्र वाचवा

अमळनेर प्रतिनिधी: आमदार साहेबांनी शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. हे सुद्धा लक्षात घ्यावं आणि यावर सुद्धा उपोषण किंवा आंदोलनाचा इशारा देतील तर बरं होईल? तमाम अमळनेर जनतेचे शेतकरी पुत्र आमदार साहेब अनिल दादा पाटील यांनी प्रशासनाला शेतकरी संबंधीत मका, कापूस, कांदा, या सर्व पिकांचा प्रश्न विचारावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रथम नागरिक असल्या कारणाने सोडवण्यात याव्यात, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अध्यक्ष माननीय, आदरणीय, शरदचंद्रजी पवार साहेब, यांचा येत्या 16 जून रोजी अमळनेर मध्ये आगमन होत असताना, त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र राज्याचे. श्री अजित दादा पवार साहेब, हे सुद्धा 16जुन रोजी अमळनेर नगरीत येत आहेत, सध्या त्यांची भूमिका विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे असून, त्यांनी सुद्धा आपल्या मार्फत शेतकरी संबंधित हिताचे सर्व प्रश्न लक्षात घेऊन येत्या पेरणीच्या अगोदर, आमच्या तमाम शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यात यावा, असे अमळनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तसेच तालुका. आम आदमी पार्टी सर्व पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या मार्फत विनंती करण्यात येत आहे. असे अंमळनेर आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष, संतोष पाटील यांच्या मार्फत आपणास विनंतीपूर्वक विनंती करीत आहोत…

[democracy id="1"]