धुळे प्रतिनिधी: दि.27/02/2023 रोजी मा.ना.श्री.मनिष सिसोदीया,उपमुख्यमंत्री, दिल्ली सरकार यांच्या अटकेच्या निषेधार्त केंद्र शासनाच्या हुकुमशाही धोरणाचा निषेध करीत
मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान, भारत सरकार नवी दिल्लीद्वारा,मा. जिल्हाधिकारी साो,जिल्हाधिकारी कार्यालय,धुळे यांना आम आदमी पार्टी धुळे चे जिल्हाध्यक्ष ईश्वर उखा पाटील ,कैलास भदाने ,शरद सोनवणे ,महादू जगन्नाथ पाटील ,बिपिन पाटील ,संदीप पाटील आदी कार्यकर्त्यांद्वारे निवेदन देण्यात आले
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, लोकशाही ही सर्वोत्तम
राज्यप्रणाली असते. लोकशाही टिकविण्यासाठी भारतीय संविधान अनुपालन करणे आवश्यक आहे.संविधान म्हणजे राज्य घटना, राज्यघटना म्हणजे लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचे मुलभूत हक्क लिखीत स्वरूपात आहेत. भारताला स्वातंत्र मिळाल्यानंर गांधी, नेहरू, पटेल यांनी लोकशाही स्विकारली, अमलात आणली, रूजवली टिकवली सुध्दा आता मात्र लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.. आर्मेड फोर्सेस व जन आंदोलनाची भिती आहे म्हणून मुजोर पक्ष सावध पावले टाकत आहे.
मा.ना.श्री.मनिष सिसोदीया यांनी दिल्ली मध्ये कामगार, रिक्षा चालक, हॉटेल कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी शिक्षण व आरोग्याच्या सेवा देवुन भारतातील नंबर 1 दिल्ली मॉडेल बनविले. देश विदेशातील नेते व परदेशी पर्यटक दिल्लीचे शिक्षण खात्यातील सेवा सुविधा व शिक्षकांना विदेशात प्रशिक्षणास पाठवुन शिक्षणाची उच्चत्तम श्रेणी प्राप्त केली. देशातील एल.आय.सी चा महाघोटाळा, मोठ मोठे उद्योजकांना भारतीय बँकेचा पैसा घेवून फरार झालेले आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची इ.डी., सि. बी. आय कार्यवाही होत नाही. केंद्र सरकारला लोकशाही मान्य नसुन देशातील विरोधी पक्षातील नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर सुडबुध्दीने तसेच विरोधी पक्षाला जेरीस आणण्यासाठीखोट्या केसेसमध्ये शासकीय तपास यंत्रणांचा खुलेआम गैरप्रकार करून लोकशाहीतील विरोधकांना संपविण्याचे षडयंत्र केंद्रसरकारने अवलंबले आहे. देशात सीबीआयने तसेच ईडीने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीत कुठलेही ठोस पुरावे आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे नाव गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र शासनाने हुकूमशाही धोरण अवलंबले असुन त्या धोरणाचा आम आदमी पार्टी, धुळे जिल्हा निषेध व्यक्त करीत आहे.