अमळनेर प्रतिनिधी- भविष्यात आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा प्रत्येक क्षेत्रात आपल्याकडे चांगल्या प्रकारचे शिक्षण जर असेल तर आपण नक्कीच यशाची उंच शिखर घातल्याशिवाय राहत नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी भरपूर अभ्यास करा व शाळेचे व गावाचे नाव उज्वल करा असे दहावीच्या निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी देवगांव देवळी हायस्कूलचे संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील अध्यक्षीय भाषणातून बोलत होते…
जेव्हा शाळेची स्थापना जून 2000 मध्ये झाली तेव्हा दहावीच्या पहिल्या बॅचला फक्त दोन विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या आज विद्यार्थिनींचे प्रमाण दहावीच्या वर्गात 22 आहे, महात्मा फुलेंनी भिडे वाड्यात पुणे येथे मूलीसाठी पहिली शाळा काढली होती ते स्वप्न प्रत्यक्ष दृष्टिक्षेपात पडले.
ते पुढे म्हणाले की कोणतीच गोष्ट तुम्हाला जीवनात सहजासजी मिळणार नाही त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. जितका तुमचा संघर्ष मोठा असेल ,तेवढं तुमचं यश मोठं असतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येकांनी जीवनात संघर्ष करा नक्कीच तुमचं यश सर्वात जास्त मोठं असेल मी पुन्हा एकदा आपण सर्वांना दहावीच्या परीक्षेच्या मनापासून शुभेच्छा देतो. ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवले त्यांचे अभिनंदन करतो असे आपल्या मनोगतातून सांगितले.
व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन चावरा वस्तीगृहाचे अधीक्षक राजू सोनकांबळे, शाळेचे लिपिक एन.जी देशमुख, दहावीचे वर्गशिक्षक एस के महाजन होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.व मान्यवरांचे स्वागत
दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून केले.
दहावीचे विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील, हर्षला पाटील ,पूजा चौधरी ,स्नेहल पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
दहावीचे विद्यार्थ्यांनी शाळेला ब्लॅकबोर्ड, डस्टर, गणित तज्ञ रामानुजनची प्रतिमा भेट दिली.
शाळेचे मुख्याध्यापकांनी महाजन यांनी प्रस्ताविक केले व इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक एस के महाजन यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळेत वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते व त्यांचा बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या शुभहस्ते देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर महाजन यांनी केले तर आभार एस के महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले. यावेळी नववी दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.