अमळनेर शहरात पाईपलाईनच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय

अमळनेर शहरात 24 तास पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असल्याने रस्त्यांची लागली वाट

24 तास पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन जोडण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची माणस नागरिकांना देताय त्रास
पावती दाखवा तरच कनेक्शन जोडले जाईल असा धरला त्यांनी मनी ध्यास

अमळनेर: शहरात 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे अनेक रस्ते खणले गेल्याने शहरातील वाहतूक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

नवीन पाण्याच्या कनेक्शनसाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कनेक्शन जोडण्यासाठी ठेकेदारांच्या लोकांनी नागरिकांकडे पावतीची मागणी केली असून, पावती दाखवल्याशिवाय कनेक्शन जोडले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कॉन्ट्रॅक्टरकडील माणसे नागरिकांना पावती दाखवण्याची सक्ती करत असून, पावतीशिवाय कनेक्शन जोडले जाणार नाही, असा अडेलतट्टूपणा केला जात आहे.

काही नागरिकांच्या मते, ही सक्ती बेकायदेशीर असून, कॉन्ट्रॅक्टरची कामकाजाची पद्धत संशयास्पद आहे. “आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून अर्ज केला आहे, तरीही कनेक्शन देण्यासाठी पावतीचा आग्रह धरला जात आहे,” असे एका रहिवाशाने सांगितले.

यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत हस्तक्षेप करून हा त्रास कमी करावा आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकारामुळे 24 तास पाणीपुरवठा योजनेचा हेतूच फोल ठरत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून नागरिकांची अडचण दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रस्त्यांच्या खोदकामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून, काही भागात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

तरी प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा सुविधा सुधारण्याचा हा उपक्रम जरी महत्त्वाचा असला, तरी नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य नियोजनाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]